मराठावाडासाथी न्यूज
औरंगाबाद : औरंगाबाद मधील आंबेडकर चौकात वाद मिटविण्यासाठी जिल्हाधिकारी गाडीतून बाहेर उतरले , तरुणाला संमजविण्यासाठी गेले असता तरुणाने चक्क जिल्हाधिकारी आणि त्यांचा सोबत असलेल्या बॉडिगार्डला अरेरावी ची भाषा केली ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आंबेडकरनगर ( भागात घडली . तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.शशांक अशोक वाघ ( वय -३० रा.औरंगाबाद ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे . पदवीधर निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे चालक , पोलिस बॉडिगार्डला यांच्या सह निवासस्थानी जात असताना आंबेडकरनगर चौकात वाहन आणि नागरिकांची ( गर्दी झाली होती , तेथे आरोपी शशांक हा रिक्षा चालकाशी वाद घालत होता , तो कोणाचेही ऐकत नव्हता हे पाहून जिल्हाधिकारी स्वतः गाडीतून खाली उतरले व त्यांनी स्वतःचा परिचय देत मी जिल्हाधिकारी असल्याचे शशांकला ] सांगितले वाद संपविण्याची विनंती केली मात्र आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला धुडकावत अरेरावीची भाषा केली तसेच त्यांच्या सोबत रक्षक म्हणून असलेल्या पोलीस अंमलदार इंगळे यांना देखील धक्काबुक्की करीत अरेरावी केली.या प्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला . सिडको पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे . शशांक हा उस्मानपुरा भागात एक त्याचे वडील हे श्रीरामपूर येथे आरटीओ निरीक्षक आहेत . स्वतः अधिकाऱ्यांचा मुलगा असून त्याने जिल्हाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने त्याच्या या बेशिस्त वर्तनाची निंदा होत आहे . जिम चालवत असून वडील श्रीरामपूर येथे आरटीओ निरीक्षक आहेत. स्वत:अधिकाऱ्याचा मुलगा असून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्याना बेशिस्त वर्तनाची निदा होत आहे .