लोणी खुर्द (ता.वैजापूर):कांद्याला भाव मिळेना म्हणून कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्याने अक्षरश: पाणी आणले आहे. एकरी ६८ हजारांवर खर्च करूनही क्विंटलमागे केवळ ६०० ते ७०० रुपये भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या कांद्याची विक्री करण्याऐवजी तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक एकरमधील ६० क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढ्यांसमोर टाकून दिला.