मराठवाडा साथी न्यूज
दिल्ली:भारत सरकारने केलेले नवे शेती कायदे रद्द करण्यासाठी तसेच शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत.
उद्या २५ जानेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २३ जानेवारी रोजी नाशिक ते मुंबई असा हजारो शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन सुरू केला.