Home क्रीडा नितीश राणाला का बनवलं KKR कर्णधार?

नितीश राणाला का बनवलं KKR कर्णधार?

166
0

केकेआरने नितीश राणाला कर्णधार बनवलं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी खेळाडू संघात होते. पण तरी राणाला कर्णधार का बनवण्यात आलं याचं कारण आता समोर आले .

अखेर KKR ला कॅप्टन मिळाला. केकेआरने ipl2023 साठी आता नितीश राणाला कर्णधारपद दिले आहे. पण केकेआरपुढे बरेच अनुभवी खेळाडू होते, पण नितीश राणालाच कर्णधारपद का दिलं याचे सर्वात मोठं कारण आता समोर आले आहे.
केकेआरच्या संघाचे कर्णधारपद यापूर्वी पॅट कमिन्सकडे होते. पण कमिन्स मायदेशी परतला आणि त्यानंतर श्रेयस अय्यर कर्णधार होईल, असे समोर आले होते. पण त्यानंतर श्रेयसला गंभीर दुखापत झाली आणि आता तो आयपीएलच खेळणार नसल्याचे समोर आले . त्यामुळे आता कर्णधार करायचे तर कोणाला, हा प्रश्न केकेआरच्या पडला होता. पण त्यांनी अखेर नितीश राणाला कर्णधार केले, तर का केल याचे कारण आता समोर आले आहे. कारण राणाकडे जास्त अनुभव नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत.

नितीशपेक्षा संघात अनुभवी खेळाडू आहेत. केकेआरच्या संघात आंद्रे रसेलसारखा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर बांगलादेशचे कर्णधारपद ज्याने भूषवले आहे तो शकिब अल हसनही केकेआरकडे आहे.या दोघांपेक्षा जास्तअनुभव असलेला वेस्ट इंडिजचा सुनील नारायणही त्या संघात आहे.या तिघांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकटचा खूप जास्त अनुभव आहे, पण तरीही या तिघांकडे केकेआरने नेतृत्व सोपवले नाही. केकेआरला जर भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून हवा होता तर त्यांच्याकडे शार्दुल ठाकूरही होता. पण तरीही त्यांनी नितीशला कर्णधार का बनवले, हे आता समोर आले आहे.

नितीश हा एक भारताचा खेळाडू आहे. त्याच्याकडे रसेल, शकिब, नरिनसारखा अनुभव नाही. पण तिन्ही खेळाडू अजून किती काळ क्रिकेट खेळू शकतात, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पहिली गोष्ट तर भविष्यासाठी एक चांगला कर्णधार आपल्याकडे असावा, हे केकेआरने ठरवले असेल. त्याचबरोबर ज्याला आपण श्रेयस किंवा कमिन्स संघात आल्यावर सहजपणे बाजूला करू शकतो आणि कोणतीही समस्य येणार नाही याचा विचारही केकेआरनेकेला सहजपणे बाजूला करू शकतो आणि कोणतीही समस्य येणार नाही, याचा विचारही केकेआरने केला आहे.
केकेआरने यावेळी एका दगडात केकेआरने दोन पक्षी मारली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here