मराठवाडा साथी न्यूज
कोल्हापूर : आज कोल्हापूर मध्ये पत्रकारांशी बोलतांना ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नाही तर पक्ष चालवण्यासाठी झाला’ असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.जर मराठा समाजाने सांगितले आणि आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडे दिले तर सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू, असा इशाराही त्यांनी दिला. शिक्षणामधले आरक्षण दिले नसल्याचा त्यांनी निषेध करत तज्ज्ञ लोकांशी सरकारने सल्लामसलत करण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे संघटना चालवण्यासाठी योग्य आहेत. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम प्रशासन चालवण्याच्या इतपत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. अजित पवार यांनी आमच्या दुखण्याबाबत बोलू नये त्यासाठी आवश्यक डॉक्टर आमच्याकडे असल्याचे दखल चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सक्षम नसल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले असून मराठा समाजालाही त्याचा फटका बसल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सरकार चालवण्यासाठी जो अनुभव लागतो तो उद्धव ठाकरे यांच्याकडे नसून अचानक आलेल्या जबाबदारीमुळे ते गोंधळून गेल्याचे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.