मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मनात शिर्डीत ११ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाची खंत कायम आहे.आतापर्यंत ते या पराभवासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच विखे पाटलांनाही जबाबदार धरत होते .रामदास आठवले यांच्या बोलण्यात बदल झाला असून विखे यांच्या मदतीनेच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. काल शिर्डीच्या दौऱ्यात या जुन्या आठवणी सांगताना ‘मी शिर्डीतून पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही’,अशी घोषणा त्यांनी खास स्टाईलमध्ये केली