Home बीड गेवराई येथे जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

गेवराई येथे जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

520
0

गेवराई
काँग्रेस पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन यशराज नगर गेवराई येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे, जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष सोनाजी कारके, गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले, संगीता हतागळे, शेख मुसा, महादेव रोकडे, काँग्रेस सेवा दलाचे गेवराई तालुका अध्यक्ष तुकाराम खरात, युवक काँग्रेसचे गेवराई तालुका अध्यक्ष किरण आजबकर, बळीराम गिराम, जीजा जगताप, राहुल घेणे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सोनाजी कारके यांनी केले. यावेळी युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात ईतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असे ठणकावून सांगितले. यावेळी उपस्थित सय्यद मन्सूर, राजु पठाण, संगीता हतागळे, वाणी अप्पा, यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे यांनी काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पुर्वी पासून ते आजपर्यंत सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गोरगरीबांना न्याय मिळवून देवू असा विश्वास जनतेसमोर व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते. . शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सामाजिक सुरक्षा समितीचे गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here