Home अहमदाबाद महाराष्ट्राच्या खेळाडूचे ४ शब्द आणि रिंकू सिंहने लगावले ५ षटकार; KKR च्या...

महाराष्ट्राच्या खेळाडूचे ४ शब्द आणि रिंकू सिंहने लगावले ५ षटकार; KKR च्या विजयात खारीचा वाटा

420
0

अहमदाबाद: अहमदाबादच्या त्या मैदानावर रिंकूसाठी कालचा दिवस अजिबातच सोपा नव्हता. शेवटचे शतक होते संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारीही रिंकूच्या खांद्यावर होती आणि इतकंच नाही तर शेवटच्या षटकासाठी स्ट्राईकी सुद्धा त्याच्याकडे होती. समोर गोलंदाज होता त्याचाच संघमित्र यश दयाल. तो संघ मित्र असल्याने त्याची गोलंदाजी रिंकूला माहित होती. शेवटच्या षटकात संघाला २९ धावांची गरज होती. वातावरण वेगळ्याचं वळणावर गेलं होतं. रिंकू सिंहमध्ये आणि त्याच्या बॅटमध्ये हे करण्याची धमक नक्कीच होती. पण त्या क्षणाला त्याला सर्वाधिक गरज होती आत्मविश्वासाची आणि हाच आत्मविश्वास फक्त ४ शब्दात त्याला मिळवून दिला आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूने. पाहूया काय म्हणाला हा खेळाडू.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवार ९ एप्रिलला संध्याकाळी उपस्थित असलेला कोणीही गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कधीही विसरू शकणार नाही. मोबाईल आणि टीव्हीवर पाहणारा प्रत्येक प्रेक्षक अजूनही त्याच ५ षटकारांच्या अवतीभोवती फिरत आहे आणि रिंकू सिंग हे नाव प्रत्येकाच्या तोंडी असेल कारण त्याने कामगिरीचं तशी केली. पण या कामगिरीसाठी त्याला एक प्रोत्साहन देणारा आणि त्याचा आत्मविश्वास बळावणारा त्याचा साथीदार होता आपला उमेश यादव.

गुजरातच्या २०५ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोलकाताला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत रिंकूला स्ट्राईक दिली. यूपीच्या या २५ वर्षीय फलंदाजाने पुढचे ५ चेंडू सीमारेषेबाहेर पाठवून केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला. आपल्या ऐतिहासिक पराक्रमानंतर रिंकूने सांगितले की, मला स्वत:वर विश्वास आहे पण उमेश यादवच्या बोलण्यानेही त्याला प्रोत्साहन दिले.

उमेशबद्दल सांगायचे तर हा सामना त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या खास नव्हता, पण तरीही त्याचे योगदान खूप खास होते. प्रथम उमेशने धावांचा वेग वाढवणाऱ्या शुभमन गिलचा झेल टिपला. यानंतर ६ चेंडूंत ५ धावांची अशी खेळी खेळली, ज्यामुळे केकेआरचा संघ मैदानात आणि सामन्यात कायम हित. उमेशने रिंकूसोबत २१ चेंडूत ५२ धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये उमेशने केवळ एक टोक हातात ठेवले नाही तर २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकूला स्ट्राईक देऊन आपले काम पूर्ण केले.

उमेश यादवने २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने त्याला स्ट्राईक दिली. त्याचा पुढचा चेंडू खेळण्याआधीच उमेश यादव आणि रिंकूने चर्चा केली त्यात उमेश त्याला म्हणाला, ‘जास्त विचार करू नको, फक्त येणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा विचार कर’, मग काय रिंकूने बॅट उचलली आणि हाहाकार केला. इतकेच नव्हे तर नितीश राणानेसुद्धा रिंकूवर खूप विश्वास दाखवला आणि रिंकूने त्याच्या या विश्वासावर खरा उतरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here