Home मनोरंजन आई कुठे काय करते;अखेर पार पडलं अरुंधती- आशुतोषचं लग्न

आई कुठे काय करते;अखेर पार पडलं अरुंधती- आशुतोषचं लग्न

250
0

मुंबई- अनिरुद्धने कितीही विरोध केला, कट- कारस्थानं केली तरीही अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न आता पार पडलं आहे. प्रेक्षक गेले कित्येक दिवस या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची होतीच मात्र आता मालिकेत दाखवलेल्या या नव्या सामाजिक पावलामुळे चाहते मालिकेचं कौतुक करत आहेत. आप्पांनी आपल्या सुनेसाठी जे केलं त्यामुळे समाजाला नक्कीच नवा आदर्श मिळाला आहे. आपला मुलगा चुकला तेव्हा कांचन आणि आप्पा यांनी त्याची बाजू न घेता त्याला त्याची चूक दाखवून दिली आणि सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिला साथ दिली. शेवटी सुनेला आपली मुलगी मानत तिचं लग्न लावून दिलं. समाजात असं फार कमी होताना दिसतं.आजच्या ११ मार्चच्या भागात अखेर आशुतोष आणि अरुंधती यांचा विवाह पार पडणार आहे. त्यामुळे अनिरुद्धचा मात्र जळफळाट होणार आहे. कालच्या भागात अरुंधती लग्न सोडून कांचन यांची समजूत घालायला गेली होती. त्यांना आणायला गेली होती. मात्र त्या आल्या नाहीत. आजच्या भागात कांचन अरुंधतीच्या कन्यादानासाठी तयार होणार आहेत. आपल्या लेकीचं कन्यादान करायला त्या होकार देणार आहेत. त्यामुळे सगळेच सुखावणार आहेत. मात्र अनिरुद्ध लग्नाचे विधी सुरू असताना वारंवार अरुंधतीसमोर येऊन तिला झालेल्या गोष्टीची आठवण करून देत राहणार आहे. मात्र त्यामुळे अरुंधतीला वाईट वाटणार आहे. सप्तपदी चालताना देखील अरुंधतीला तिची झालेली प्रतारणा आठवणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती दुखावली जाणार आहे. मात्र इथेही आशुतोष तिला धीर देणार आहे.आता अरुंधतीच्या आयुष्याची पुन्हा एकदा नवीन सुरुवात होत आहे. त्यामुळे घरातले सगळेच खुश आहेत. संजनाही प्रचंड खुश आहे. शेवटी अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न पार पडलं मात्र अनिरुद्ध त्यांचा संसार सुखाचा होऊ देईल का, तो पुन्हा काही कुरापती करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल का, हे सगळं येत्या भागांमध्ये कळेलच. मात्र सध्या तरी प्रेक्षक अरुंधतीच्या आनंदात आनंदी आहेत हे नक्की.

https://www.instagram.com/reel/Cpg0yhijaAM/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here