औरंगाबाद :जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा तीव्र हाेत्या. कमाल तापमानासाेबत या आठवड्यात प्रथमच किमान तापमान वाढले आहे . किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअवर हाेता. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान उच्चांकी तर किमान तापमान नीचांकी पातळीवर हाेते. त्यामुळे तापमानात माेठी तफावत निर्माण झालेली आहे. रविवारी कमाल तापमान पुन्हा एकदा ३६ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर गेल्याने सकाळी ११ वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढलेली हाेती.दुपारी २ वाजेनंतर उन्हाच्या तीव्र झळांनी भुसावळकर नागरिक हैराण झाले हाेते. रविवारी पहाटेच्या वेळी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवर असल्याने थंडीची तीव्रता गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसी कमी झाल्याचे जाणवले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २७ फेब्रुवारीपासून राज्यात तापमानात वाढ हाेणार आहे. पारा ४० अंशांपुढे जाऊ शकताे. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची स्थिती देखील निर्माण हाेऊ शकते.