औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास राज्य शासन व केंद्र सरकारने मंजुरी दिली असताना एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी उपोषण केले. त्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार जलील यांच्या प्रतिमेचे दहन करून, प्रतीकात्मक होळी करून निषेध केला. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष श्याम कदम, उपशहरप्रमुख सीताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपस्थित होते.