छत्रपती संभाजीनगर :संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे, मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा एकही जातीय दंगल झाली नाही, पण आता इतक्या झाल्या की विचारू नका. गृहमंत्री कुठं असतात माहिती नाही. गृहमंत्री आणि सरकारचं हे अपयश आहे.
खैरे पुढे बोलताना म्हणाले की, काल हा प्रकार झाला, आज रामनवमी आहे. यामुळे संपूर्ण देशात दंगलीचं वातावरण होईल. महत्वाचं म्हणजे हा २ तारखेला जो महाविकास आघाडीचा मेळावा डिस्टर्ब करण्याचा हा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. रामनवमी होऊ नये, मेळावा होऊ नये म्हणून कालचा प्रकार झाल्याचे खैरे यावेळी म्हणाले.
Home छत्रपती संभाजी नगर ठाकरे गटाच्या नेत्याचे फडणवीसांवरआरोप म्हणाले; छ. संभाजीनगर येथील राड्याचे ..