Home महाराष्ट्र महाराष्ट्रासह ४ राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल ; भारतात परिस्तिथी नियंत्रणाबाहेर

महाराष्ट्रासह ४ राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल ; भारतात परिस्तिथी नियंत्रणाबाहेर

440
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : भारतात सण उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा केंद्रीय समितीने दिला होता. तशीच परिस्थिती देशात निर्माण होताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रासह चार राज्यांना सध्याच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू,मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

“दिल्लीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारने दाखल करावा,” असे निर्देश न्यायालयाने दिल्ली सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत,” असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here