कपिल शर्मा देशातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले, आता कपिलचा झ्विगाटो हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कपिलने आपल्या आयुष्यातही केलेल्या कांडबाबतची कबुली दिली. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कपिल थेट दारू पिऊन गेला असल्याचा किस्सा त्याने सांगितला.
कपिल शर्माने यावेळी आपल्या वाईट अनुभवाबाबत सांगितले. तो म्हणतो माझा एक काळ इतका वाईट होता कि कोणी मला भाव देत नव्हतं. कोणी जोक्सवर हसायला तयार नव्हतं त्यावेळी दारू पिण्याची सवय लागल्याचे कपिलने सांगितले. एकदा शाहरुख खान त्याला भेटायला आला आणि त्याला त्याच्यासोबत ड्राईव्हला घेऊन गेला. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने कपिल शर्माला समजवण्याचा प्रयत्न केला. अक्षय कुमारनेही त्याला खूप मदत केली असल्याचे त्याने सांगितले.
कपिलने आणखी एक किस्सा सांगितला, जेव्हा फिरंगी रिलीज होणार होता, तेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटासाठी व्हॉईस-ओव्हर करत होते. डबिंग सुरू असलेल्या स्टुडिओत त्याला जायचे होते. कपिल शर्माने सांगितले की, तो स्टुडिओत गेला होता. सकाळचे ८ वाजले होते आणि तो आधीच दोन पेग घेऊन आला होता. अमिताभ बच्चन यांनी फिरंगीचा व्हॉईस ओव्हर पूर्ण केला होता आणि त्यांच्या चित्रपटासाठी डबिंग करत होते.
अमिताभ बच्चन यांच्या कर्मचार्यांनी त्यांना आत येऊ देण्यास नकार दिला, पण कपिल आतमध्ये जाण्यावर ठाम होता.यावेळी कपिलने चांगलाच वाद देखील घातला. त्यानंतर कपिलने माफी देखील मागितली होती.कपिलने यावेळी दिलखुलास संवाद साधत आपल्या आतापर्यंतच्या अनेक आठवणी मुलाखतीवर सांगितल्या.