मराठवाडा साथी न्यूज
एडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या दिवशी ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा करता आल्या. भारताचा पहिल्या डाव २४४ धावांवर संपुष्ठात आला.