Home मुंबई ईडीच्या वकिलांनी सदानंद कदमांना अटकेचे सांगितलं कारण…

ईडीच्या वकिलांनी सदानंद कदमांना अटकेचे सांगितलं कारण…

643
0

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना काल ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेसाठी मोठी ताकद लावल्याची चर्चा आहे. या सभेनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये सदानंद कदम यांनी अटक झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.दरम्यान, ईडीचे वकील सुनिल गोन्साल्वीस यांनी सदानंद कदम यांच्या अटकेचं कारण सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना गोन्साल्वीस म्हणाले, “याप्रकरणी ११ मे २०२२ ला ईडीकडून इसीआयआर दाखल करण्यात आला होता. पण योग्य पुरावे मिळेपर्यंत अटक करता येत नव्हती. सदानंद कदम यांना 3 वेळा समन्स पाठवलं होतं – १२ डिसेंबर २०२२ फेब्रुवारी २०२३ आणि ९ मार्च २०२३. पण ते चौकशीसाठी आले नाहीत.गोन्साल्वीस पुढे म्हणाले, “त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणलं. चौकशीनंतर १० मार्च रात्री ९ वाजता त्यांना अटक केली. अटक करण्यासाठी सबळ पुरावाही ईडीकडे होता. तसंच त्यांनी चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे ही अटक करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here