क्रिकेट हा अतिशय चुरशीचा खेळ मानला. क्रिकेटमध्ये कसोटी असो, वन डे असो किंवा टी २० असो…. सर्वच ठिकाणी १-१ धाव महत्त्वाची असते. खेळाडूची विकेट, एखादा कॅच किंवा अगदी एखादी रन यावर सामन्याचा अख्खा निकाल पालटू शकतो.
त्यामुळेच क्रिकेटमध्ये शक्य तितकी अचूकता आणली जावी याकडे साऱ्यांचाच कल असतो. याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये DRS चा समावेश करण्यात आला. एखादा खेळाडू बाद आहे की नाही याबद्दल साशंकता असेल तर DRS च्या मदतीने शहानिशा करता येणं आता शक्य झालं आहे. पण काही वेळा एखाद्या नो बॉल किंवा वाइड बॉलमुळेही अख्खा सामना वेगळीच कलाटणी घेतो. हा निर्णय काही वेळा चुकीचा असल्याचे कळते पण तोवर वेळ निघून गेलेली असते. याच गोष्टींच्या अचूकतेसाठी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा निर्णय घेतला गेला आहे.