Home क्रीडा ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता मिळवला मोठा विजय!

ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता मिळवला मोठा विजय!

222
0

भारताला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. कारण भारताचा डाव हा फक्त ११७ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हा सामना सहजप जिंकला.

भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव मिळाला . भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताला फक्त ११७ धावाच करता आला . ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हा सामना सहजपणे जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे .

या सामन्यात तर भारताचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात भारताच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद झाले आणि त्यामुळे त्यांचा डाव गडगडला. विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक ३१ धावा केल्या आणि त्यामुळेच संघाला ११७ धावा तरी करता आला . त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीत काही तरी कमाल दाखवणार , अशी आशा चाहत्यांना होती. पण ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यामुळे भारताला लाजीरवाणा पराभव झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here