लग्न करणे आवश्यक आहे का? हा प्रश्न सर्वांच्या मनात येऊन जातो. सध्याच्या ९० च्या दशकातील लोकांसाठी हा खूप आव्हानात्मक काळ आहे. कारण आजकाल एकतर ते स्वतः लग्न करत आहेत किंवा लग्नाच्या भितीने लांब पळत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की इतके लग्न का होत आहेत? आजकाल घटस्फोट, फसवणूक, जोडीदाराची हत्या यासारख्या गोष्टी खूपच सामान्य आहेत. एक चांगला जोडीदार मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. यासाठी अध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. जर तुम्हीही लग्न करण्याबाबत संभ्रमात असाल की नाही, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतात.कायदे, नियम, रीतिरिवाज, समजुती आणि पद्धतींने एकमेकांना स्विकारतात.
वैवाहिक जीवनात दोन व्यक्ती एकमेकांच्या बंधनात अडकतात. प्रत्येक सुख-दु:खात सोबत उभे राहतील या वचनाने. एकमेकांच्या उणीवा बाजूला ठेवून एकमेकांसोबत आयुष्य जगतात. तर हिंदू धर्मात विवाहाचा संबंध केवळ एका जन्माचा नाही तर सात जन्मांचा मानला जातो. लग्नात साता जन्मांच्या हाणाभाका घेतल्या जातात.
श्री श्री रविशंकर म्हणतात की लग्न करून कुटुंब सुरू करण्यापेक्षा आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखाद्याशी लग्न करून आनंदी होऊ शकता, तर नक्कीच लग्न करा. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अविवाहित जास्त आनंदी राहू शकता, तर तुम्ही लग्नाशिवाय आयुष्य जगू शकता.
हा प्रश्न जेव्हा श्री श्री रविशंकर यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की तुम्ही लग्न करणे आवश्यक नाही. लग्न करायचं किंवा न करायचं हा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
आजच्या तरुणांचा लग्नावर विश्वास नाही . विशेषतः असे लोक जे जास्त शिकलेले आहेत. बिघडत चाललेली नातेसंबंध, महागाई तर कधी आराम गमावण्याची भीती या आजूबाजूच्या उदाहरणांमुळे हे मुख्यत्वे आहे.आजच्या काळात म्हातारपणी एकटे राहण्याच्या चिंतेने लोक आजच्या स्वातंत्र्याशी अजिबात तडजोड करू इच्छित नाहीत