Home मुंबई एक खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नाही…!

एक खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नाही…!

387
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावातील खानापूर ग्रामपंचाय गमवावी लागली आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.मात्र,पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही,अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते म्हणाले की,खानापूरमध्येपैकी जागा आम्ही जिंकल्या आहेत.जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहोत.मात्र,तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे,असे म्हणत एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे,असे देखील पाटील म्हणाले.

दरम्यान,राज्यात पक्षाचे कडबोळ सत्तेत आहे.मी पहिल्यापासून सांगतो चारही पक्षांनी स्वबळावर लढावे,मग पाहा आम्हीच नंबर वनला असू. राज्यातील आघाडी सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही, अशी टीका त्यांनी केली. ग्रामपंचायतीत निवडून आलो म्हणजे जिंकलो असे होत नाही. त्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आला तरच ग्रामपंचायत हातात आली असे म्हणता येते,असे सांगतानाच संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट होईल. त्यावेळी आमचीच संख्या जास्त असेल,असा दावाही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here