Home मनोरंजन ज्याची भीती होती तेच झालं – अरबाज खान

ज्याची भीती होती तेच झालं – अरबाज खान

608
0

बॉलिवूड स्टार्सचे लग्न आणि घटस्फोट या दोन्ही बातम्या सतत चर्चेत असतात. एकेकाळी कलाविश्वात मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना जोडीकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं.

एका फोटोशूटच्या दरम्यान, पहिल्यांदाच भेट झालेल्या मलायका- अरबाजने १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, तब्बल १९ वर्षानंतर त्यांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये ही जोडी विभक्त झालं. परंतु, अरबाजचं मलायकावर आतोनात प्रेम होतं. एका मुलाखतीमध्ये त्याने मलायकाचा विरह सहन करु शकत नाही, असंही म्हटलं होतं.

अरबाज खानने त्याच्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये मलायकासोबतच्या नात्याबाबत खुलासा केला होता. ही मुलाखत अरबाजने तेव्हा दिली होती ज्यावेळी तो मलायकापासून वेगळा झालेला नव्हता. या मुलाखतीत अरबाजने मलायकासाठी काय वाटते हे सांगितले. अरबाज म्हणाला होता की, तो मलायकावर जगात सर्वात जास्त प्रेम करतो. मलायकाने कधीही मला सोडून जाऊ नये अशी त्याची इच्छा होती. अरबाजने म्हटले होते की, सुरुवातीला असे नव्हते, नंतर हळूहळू पझेसिव्ह होऊ लागलं,

मात्र, नशिबाला काही वेगळेच मंजूर होते. मलायका आणि अरबाजने एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज दोघेही वेगळे झाले असले तरी अनेकदा मुलगा अरहानसाठी एकत्र उभे राहताना दिसतात. सध्या अरबाज इटालियन मॉडल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायकाने त्यांचं नातं जाहीरपणे मान्य देखील केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here