Home राजकीय ती सावरकर नव्हे, तर अदाणी गौरव यात्रा; संजय राऊत

ती सावरकर नव्हे, तर अदाणी गौरव यात्रा; संजय राऊत

248
0

सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, यावरून आता संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. शिंदे सरकारची ही यात्रा ‘सावरकर गौरव यात्रा’ नसून ‘अदाणी गौरव यात्रा’ आहे, असं ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावकरकांना वाळीत टाकलं होतं. आता भाजपाकडून राजकीय ढोंग सुरू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी वीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. यावेळी सावरकरांबद्दल दोन वाक्य ते उस्फूर्तपणे बोलू शकले नाहीत. एका कागदावर लिहिलेलं वाचून दाखवत होते. त्यांच्या हृदयात जर सावकर आहे, त्यांनी उस्फूर्तपणे बोलून दाखावयला पाहिजे होतं. पण ते उपमुख्यमंत्र्यांना वाचू का? असं विचारत होते. यालाच गुलामी म्हणातात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारने वीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली आहे. मात्र, ती अदाणी बचाव यात्रा आहे. अदाणी प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्यातसाठी सावरकराच्या मुखवट्याखाली हे अदाणी गौरव यात्रा काढत आहेत. शिंदे गट आणि भाजपाने सावरकर गौरव यात्रा काढणं म्हणजे, ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here