Home अर्थकारण जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’

जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’

268
0

नवी दिल्ली : अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट दिवसेंदिवस आपले पाय पसरवत आहे. अमेरिकेत दोन बँका बुडाल्या असून इतर अनेक बँका आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. तसेच युरोपातील सर्वात मोठ्या बँकांपैकी असलेल्या क्रेडिट सुईसची स्थिती बिकट बनली आहे. आता त्याचे पडसाद भारतात देखील जाणवत आहे. यामुळे भारताच्या आयटी कंपन्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. पण अमेरिका व श्रीलंकेत निर्माण झालेलं भीषण बँकिंग संकट यामुळे भारताने चिंतित व्हायला हवं का? विश्लेषकांनुसार कंपन्यांच्या उत्पन्नापैकी ४१% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जगातील बड्या बँक प्रभावित झाल्यामुळे त्याचा या क्षेत्राच्या महसुलावर वाईट परिणाम होऊ शकतो

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि HCL सारख्या बड्या कंपन्यांचा ४०% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) कंपन्यांमधून येतो. सध्याच्या काळात वाढती महागाई रोखण्यासाठी जगभरातील बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर सुस्तीने वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. आणि आता बँकिंग संकटाचे त्याने टेन्शन आणखी वाढवले आहे. अशा स्थितीत भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होतोय, हे लवकरच कळेल.

अमेरिका आणि युरोप हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे सर्वात मोठे आहे. दरम्यान आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशातील सर्वात मोठी IT कंपनी टीसीएसच्या एकत्रित उलाढालीमध्ये BFSI चा हिस्सा सुमारे ४० टक्के होता तर इन्फोसिसच्या बाबतीतही असेच आहे.सिलिकॉन व्हॅली बँक रातोरात बुडाली. यानंतर सिग्नेचर बँकेला टाळं लागलं. क्रिप्टो कंपन्यांना कर्ज देणारी ही बँकही बंद पडली. तर फर्स्ट रिपब्लिक बँकही बंद पडण्याच्या वाटेवर आहे. एका अहवालानुसार अमेरिकेतील १८६ बँका वाढत्या व्याजदरामुळे कोसळण्याच्या वाटेवर असून सोमवारी बाजार उघडताच युरोपमधील क्रेडिट सुइसचे शेअर्स ६३% कोसळले. तर बँकेला मदतीचा हात दिलेल्या UBS चे समभागही सुरुवातीच्या व्यवहारात १४ टक्क्यांनी कोसळले.

अमेरिका आणि युरोपमधील बँकांच्या बिकट परिस्थितीचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवरही होऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपन्यांच्या कमाईवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. आयटी दिग्गज आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे माजी सीईओ विनीत नायर म्हणाले की, पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण अनिश्चित वातावरणामुळे नवीन प्रकल्प प्रभावित होतील. खर्चाचा ताण वाढेल, ज्यामुळे आउटसोर्सिंग वाढेल आणि विद्यमान करारांचे पुनर्निगोशिएशन देखील होईल. यासह, आयटी कंपन्या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर वाढवतील जेणेकरून त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here