Home राजकीय २३ जानेवारीला देशात ‘राष्ट्रीय सुट्टी’ जाहीर करा ; ममता बॅनर्जींचे मोदींना पत्र

२३ जानेवारीला देशात ‘राष्ट्रीय सुट्टी’ जाहीर करा ; ममता बॅनर्जींचे मोदींना पत्र

474
0

मराठवाडा साथी न्यूज

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या आहेत.

त्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी मोदींना पत्र लिहिले असून भावनिक मुद्द्यांना हात घातला आहे.त्यामध्य नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच, सुभाष चंद्र बोस यांच्या निधनाचे गुढ शोधून काढावे, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. टाइम्स नॉऊने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी मुखर्जी आयोगाच्या अहवालाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अहवालात कुठलेही कारण किंवा माहिती न देताच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मृत घोषित केलं आहे. नेताजी यांचे वंशज सूर्य बोस आणि माधुरी बोस यांनी एक खुले लिहिले आहे. त्यानुसार, ८ नोव्हेंबर २००५ च्या न्यायमूर्ती मनोज कुमार मुखर्जी यांच्या अहवलात असे नमूद केली की, नेताजी यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसून टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजी यांच्या नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here