Home मुंबई संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा;तोंड उघडायला लावू नका तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल

संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा;तोंड उघडायला लावू नका तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल

264
0

विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणम्याचे घाणेरडे राजकारण राज्यात देवेंद्र फडणवीसांनी सुरू केले. केंद्रात मोदी आणि शहांनी असे राजकारण सुरू केले, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.तसेच, तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आमच्याकडे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राजकारणात कुणाच्याही कुटुंबापर्यंत पोहोचायचे नाही, अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे आम्ही असे घाणेरडे, दळभर्दी राजकारण कधीच केले नाही. मविआतील घटक पक्षांनीही असे राजकारण केले नाही. मात्र, राज्यात ही कटुता देवेंद्र फडणीसांनी आणली.संजय राऊत म्हणाले, आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत. भाजप नेत्यांनी आरोप केले की लगेच कारवाई होते. विरोधकांनी पुरावे दिले तरी कारवाई होत नाही. कालपर्यंत आम्ही भाजप नेत्यांवर जे आरोप केले आहेत, त्याचे सर्व पुरावे जाहीर केले आहेत. तरीही भाजप नेत्यांना क्लिन चीट दिली जाते व विरोधकांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले जाते. आमच्याकडेही तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल. राजकारणात कुणाचेही कुटुंब आणू नका.दरम्यान, विधानसभेसाठी भाजपने शिंदे गटाला ४० ते ४५जागा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाची लायकीच हीच आहे. शिवसेनेने एका जागेसाठी भाजपसोबत युती तोडली होती. हा शिवसेनेचा स्वाभिमान होता. आता भाजप जे तुकडे फेकेल ते शिंदे गटाला आयुष्यभर चघळावे लागतील. पुढील निवडणुकीत भाजप ४० काय ५ जागाही शिंदे गटाच्या तोंडावर फेकणार नाही. भाजपला शिवसेनेचा रुबाब, दरारा नष्ट करायचा होता. त्यामुळेच भाजपने शिवसेना तोडली व फेकलेल्या तुकड्यावर जगणारे निर्माण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here