मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं.पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली.सोबतच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा मांडला जाईल,असंही यावेळी त्यांनी सांगितले.