सर्वप्रकारचं खाद्यतेल 30 टक्क्यांनी महाग झालं आहे. पामतेलाचं उत्पादन घटल्याने खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता खाद्यतेलाच्या दराचा आढावा घेतला जाणार आहे. तर डाळींच्या दरात ३० रुपयांनी घट झाली आहे. याशिवाय पालेभाज्या किंमतीतही घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे.