नांदेड : ‘सरकारच गुणगान केलं तर बरं आहे.विरोधात बोललं तर काही खरं नाही अशी परिस्थिती आहे.आणीबाणीत जे घडलं नाही अश्या घटना घडतात. सरकार विरोधात बोललं तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत ही शोकांतिका आहे,अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली.नांदेडमध्ये संगीत शंकर दरबार सोहळा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण हे उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.आजची परिस्थिती पाहिली तर सर्वच वातावरण बदलत चाललं आहे. मोकळेपणाने बोलू शकतात का, सरकारचं गुणगान केलं तर सगळं चांगलं आहे. सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल. पण जर विरोधात बोललं तर मग काही खरं नाही. एवढंच नाहीतर, सरकारच्या विरोधात बोलला तर आणीबाणीमध्ये असं काही घडलं नाही, तिथे लोकांना जीवे मारण्यापर्यंत घटना घडतात, ही देशाची शोकांतिका आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.