Home मनोरंजन ईशा आणि अनिशला एकत्र पाहून अरुधंतीला बसला धक्का

ईशा आणि अनिशला एकत्र पाहून अरुधंतीला बसला धक्का

216
0

मुंबई: ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. काही आठवड्यांपूर्वी मालिता टीआरपीच्या स्पर्धेत घसरली होती. मात्र आता पुन्हा मालिकेनं जोर पकडला आहे. अरुंधतीनं सगळं मागे सोडून नवं आयुष्य सुरू करावं, आपलं जीवन आनंदाने जगावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती.
त्यानुसार, आता अरुंधती आणि आशुतोष यांचा संसार सुरू झालाय. तिच्या आयुष्यात सुखाचे क्षण आलेत. पण जुन्या नात्यांमुळं पुन्हा एकदा या सुखाला कुठतरं दु:खाची किनार आहे. असं वाटत राहतं. लग्नानंतर अरुंधतीचा पहिला गुडी पाडवा होता. आशुतोषच्या घरी आनंदानं गुडी उभारत ती देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी जाते , पण तिथं अनिरुद्ध तिचा अपमान करतो. तर यश आणि गौरीच्या नात्यावरून अनिरुद्ध अरुंधतीला बोलतो. तर संजनाही गौरीची बाजू घेत बोलते. हे पाहिल्यानंतर अरुंधती यशला समजावते आणि पुन्हा आशुतोषसोबत घरी येते.
देशमुख कुटुंबियांच्या घरून परतल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर तिथं ईशा आणि अनिष यांना एकत्र पाहून अरुंधतीला धक्का बसतो. ईशा आणि अनिष एकमेंकांच्या मिठीत पाहून अरुंधती चिडते. यानंतर ईशा आणि अनिशही प्रचंड घाबरतात दोघंही , स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. पण अरुंधती त्यांना थांबवते आणि गौरीला सुनावते. ‘हे काय आहे ईशा? असं अरुंधती विचारते. मैत्रिणीकडं जाणार होतीस ना, अन् इथे आलीस. पण यावर गौरी म्हणते की, आम्ही काय चुकीचं केलं नाहीये. यावर अरुंधती म्हणाली की, चुक काय बरोबर आहे, हा मुद्दा नाहीये. तुमच्या नात्याचं काय होणार आहे माहिती नसताना तुम्ही एकातांत असं…हे मला अजिबात पटत नाहीये. तुला सगळी परिस्थिती माहित्येय ईशा. तुमच्या नात्याला विरोध होणार आहे हे कळतंय. यातून तुम्ही मार्ग काठू शकणार आहात की नाही, हे तुम्हाला माहितच नाहीये. हे असं असताना का स्वत:वर ताबा ठेऊ शकत नाही आहात.अजून कशात काही नसताना, तुम्ही एकमेकांच्या इतके जवळ येताय, याला काय योग्य म्हणायचं का?असं म्हणत अरुंधती ईशाला घरी जाण्यास सांगते. तसंच पुन्हा अनिशला एकट्यानं भेटायचं नाही, अशी तंबीही देते.त्यामुळं आता ईशा आणि अनिशच्या नात्यचं नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here