मराठवाडा साथी न्यूज
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.कारण ११ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेच्या वाट्याला फक्त २ जागा आल्या आहेत.नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये १३ जागा होत्या,त्यापैकी २ प्रभागात बहिष्कार असल्याने ११ जागांवर निवडणूक होणार होती.पण ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या.यामध्ये शिवसेना एक तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले.दरम्यान,८ जागांवर निवडणूक झाली यामधील एका जागेवर शिवसेना तर उर्वरीत ७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.