Marathwada Sathi

कृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : सध्या नवी दिल्ली येथे कृषी विधेयक कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.आज या आंदोलनाचा १२ वा दिवस असून उद्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे.दरम्यान,या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून पाठींबा मिळत आहे.दरम्यान,शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आणि कृषी कायद्याला विरोध करीत औरंगाबादमधील क्रांती चौक या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले असून त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. केंद्र सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु राहील, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. जोपर्यंत कायदे रद्द केले जाणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतील.असाहि इशारा केंद्र सरकारला आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version