Home क्राइम पत्नीने केली तक्रार…!

पत्नीने केली तक्रार…!

876
0

मराठवाडा साथी न्यूज
कानपूर:
उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीच्या हत्याकांडाचा अडीच महिन्यांनंतर पर्दाफाश केला. पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्येचे कारण उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने तिने पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी तपास करून आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
आरोपी रेणू हिने ५ ऑक्टोबरला प्रियकराच्या मदतीने पती रवी याची हत्या केली होती. त्यानंतर प्रियकराने आपला नातेवाइकाच्या मदतीने रवीचा मृतदेह कानपूरपासून दूर असलेल्या निर्जन ठिकाणी फेकून दिला होता. दुसरीकडे रेणूने पती रवीच्या अपहरणाचा बनाव रचला. त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रेणूने हाताची नस कापली. पतीच्या विरहामुळे आत्महत्या करत होते, असे दाखवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या.५ ऑक्टोबर रोजी पत्नी रेणू हिने पती रवीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. रेणू आणि मोनू यांची प्रेमकहाणी लॉकडाऊनच्या काळात सुरू झाली होती. त्यावेळी मोनू आपले काम सोडून रेणूच्या घरी राहायला आला होता. तो रेणूचा नातेवाइक आहे. महिलेने आधी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याच्या मदतीने पतीची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here