मराठवाडा साथी न्यूज
शिवसेनेचा ६ जागांवर विजय
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात मोठा धक्का बसला आहे.चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ३ पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले होते.त्यामुळे या युतीची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली होती.मात्र,शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना खानापूर मध्ये सत्ता राखण्यात यश आले आहे.आबिटकर यांच्या पॅनलने ६ जागांवर विजय मिळवत पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.शिवसेनेने ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की,”गाव करील ते राव काय करील,”खानापूरची जनता सुज्ञ असून विकासाच्या कामावर हा विजय झाला आहे.त्यामुळे मी खानापूरच्या जनतेचे आभार मानतो.