मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या समस्येने ग्रस्थ असलेले लोकप्रिय टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांचे आज निधन झाले आहे. संपूर्ण टीव्ही जगतात दुःखाची लाट पसरली आहे.अलीकडेच टीव्ही अभिनेत्री ‘लीना आचार्य यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले.आता त्यांच्यानंतर काही दिवसांमध्येच अभिनेते आशिष रॉय यांनीही ‘आज’ अखेरचा श्वास घेतला.आशिष रॉय यांचेही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळेच निधन झाले.आशिष बर्याच वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि यावर ते वेळोवेळ उपचारही घेत होते.मात्र आज त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीएनटीएएचे वरिष्ठ सहसचिव अमित बहल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. अमित बहल म्हणाले की, ‘आशिष रॉय यांचं घरीच निधन झाले आहे.दिग्दर्शक अरविंद बब्बल यांनी मला फोनवर ही माहिती दिली.’
आशिष रॉय यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. या वर्षी मे महिन्यात, त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून चाहते आणि सहकलाकारांकडे आर्थिक मदत मागितली होती. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे ते डायलिसिसवर होते. याचसाठी त्यांना पैशांची अत्यंत गरज होती.
आशिष रॉय यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपना बात’, ‘व्योमकेश बक्षी’, ‘येस बॉस’, ‘बा बहु और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘स्टार्ट‘ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.