Home क्राइम ….. तर वाचला असता त्या मासूम जीवांचा प्राण!

….. तर वाचला असता त्या मासूम जीवांचा प्राण!

659
0

मुंबई : ९ जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला आग लागून नवजात १० जीवांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लागलेल्या आग प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला 50 पानी अहवाल तयार केला आहे.शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली, असं समितीने अहवालात स्पष्ट केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.’यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या 2 परिचारिकांच्या कामावर ठपका ठेवण्यात आला आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती. तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असं परखड मत समितीने नोंदवले असल्याचे समोर आले आहे.पुढील दोन दिवसांमध्ये समिती आपला अहवाल हा भंडारा पोलिसांना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

तसेच रुग्णालयामध्ये रात्रपाळीला असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांवर सुद्धा बोट ठेवण्यात आले आहे. रात्रीपाळीला असताना एका डॉक्टरांनी या वार्डाकडे राऊंड मारला नाही. त्यामुळे समितीने वरिष्ठ अधिकारी आणि 2 परिचारिकांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here