मराठवाडा साथी न्यूज
नवी मुंबई : वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे.अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासून वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाल्या. या पावसाने वातावरणात गारवा पसरला असला तरी अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे कोणतीही कल्पना नसताना कामाधंद्यासाठी निघालेल्या लोकांना सकाळी पावसामुळे तारांबळ उडाली.