Home क्रीडा टीम इंडिया ‘लय भारी’…!

टीम इंडिया ‘लय भारी’…!

376
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा विकेट्सने पराभव करुन मालिका २-१ खिशात घातली.भारताने मोठ्या थाटात ब्रिस्बेन ग्राऊंडवर विजयी जल्लोष केला. भारताच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांकडून टीम इंडियावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख

भारतीय संघाने विजय साजरा केल्याबरोबर ‘इंडिया झिंदाबाद’ अशा शब्दात त्याने टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. भारतीय संघाचा अभिमान वाटतो, अप्रतिम विजय… असं म्हणत रोमहर्षक विजयाबद्दल भारतीय संघाच्या कर्णधाराचं रितेशने अभिनंदन केले आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय… रिषभ पंत, शुभमन गिल, ठाकूर, पुजारा, वॉश्गिंटन सुंदर काय खेळलेत…अमेझिंग विजय.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन… भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चित ऐतिहासिक आहे…. ब्रिस्बेनमध्ये ३२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला… वेल डन टीम इंडिया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here