Marathwada Sathi

मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

मराठवाडा साथी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दसरा मेळाव्यातील भाषणात ठाकरे यांनी भाजपच्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपनेही उत्तर दिले होते. . सर्वांवर टीका करणारी शिवसेना काँग्रेसचे नेते सावरकरांच्या संदर्भात अपमानकारक बोलत असताना गप्प का होती? असा सवाल भाजपने केला होता. त्यावर संजय राऊत यांनीही ‘भाजपनं अद्याप सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?’, असा सवाल करत पलटवार केला आहे

भाजप नेते राम कदम यांनी सावरकरांचा मुद्दा काढून शिवसेनेवर टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सावरकर नेहमीच शिवसेनेचे मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. जेव्हा सावरकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेला आम्ही त्यांच्याबाजूनं भूमिका घेतली. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणीही आम्ही पहिल्यांदा केली होती. जे आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत, त्यांनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, याचे उत्तर द्यावं? असे त्यांनी म्हटले आहे.



डायट आणि थेरॅपेटीक डायट म्हणजे काय ? आरोग्यतज्ज्ञ मोनिका पाटील यांच्याशी चर्चा – मराठवाडा साथी विशेष

.


Exit mobile version