मराठवाडा साथी न्यूज
कणकवली : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत हाती आलेला निकालात शिवसेनेने बाजी मारली आहे.भाजपचे आमदार नितेश राणे यांनाही सेनेने चांगलेच तोंडावर पाडले आहे.सोनाळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनाळी गावात ७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.त्यापैकी पाचही जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.दरम्यान,सोनाळी गावात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.त्यामुळे नितेश राणे यांना हा धक्का चांगलाच बसला असल्याचे दिसून येत आहे.
फक्त नितेश राणेंचेच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे.चंद्रकांतदादा पाटील यांचा मुळगावी भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेच्या प्रकाश अबिटकर यांनी बाजी मारली आहे. खानापुरात ६ जागा शिवसेनेकडे गेल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे.
तसेच अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावामध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.कारण १७ पैकी १३ जागा जिंकत परिवर्तन पॅनलने विजय मिळवला आहे.