मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच ते मुख्यमंत्री
करतील, असं माझं विश्लेषण आहे. शरद पवारांनी तसं करणं चुकीचंही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना काय-काय बोलणे खावी लागलीत याची माहिती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र तरीही हे चुकीचं नाही, त्यांच्या मुलीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे, हे माझं विश्लेषण आहे, यावर मी ठाम आहे, असंही ते म्हणाले.
सर्वसामान्य माणूस म्हणून सांगायचं झालं तर शरद पवारांना संधी मिळाली तर सोडून गेलेल्या अजित दादांना उपमुख्यमंत्री करायचं असतं. तिथे जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना करायचे नसते. वेळ आली तर ‘पिंपरीत’ पार्थ पवार,आणि रोहित पवार यांना जिल्हा बदलून जायची संधी मिळते असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.