Marathwada Sathi

भाजप नेत्याचा खळबळजनक खुलासा ; ‘शिंदे गटात जाण्यासाठी भास्कर जाधवांनी केले होते 100 फोन…’

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी 100 वेळा फोन केल्याचा दावा करत मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे.

सरकारकडूनही संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ म्हणून उल्लेख, याच उपाधीवरुन सत्ताधारी-विरोधक भिडलेले याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी भास्कर जाधव यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. “भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटात सहभागी होण्यासाठी १०० वेळा कॉल केल्याचा दावा या ट्विटमध्ये केला आहे. मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भास्कर जाधव गटात घेण्यास इच्छुक नसल्याचेही” या ट्विटमध्ये म्हणले आहे.

इतकेच नव्हे तर “भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीटही बुक केल्याचेही मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. जाधव हे सत्य नाकारू शकतात का?” असा थेट सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. या ट्विटनंतर राजकीय मैदानात चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली होती. ज्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

Exit mobile version