मराठवाडा साथी न्यूज
राकेश रवळे
औरंगाबाद : ओबीसी समाजाचा आरक्षण हे धोक्यात आले आहे. आरक्षण वाचवण्यासाठी ‘अखिल भारतीय महात्मा जोतिबा फुले समता परिषद,औरंगाबाद’ मध्ये आज मिटिंग घेण्यात आली.आता ओबीसी समाज हा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार आहे.ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणता ही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही मोर्चा करू असे आव्हाहन ओबीसी समाजाचे नेते डॉ नागेश गवळी , मनोज घोडके यांनी ओबीसी समाजाला केले आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जी समता परिषद उभी केली आहे तेथील समता परिषदेचे कार्यकर्ते जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये मोर्च्याचे आयोजन करणार आहेत.