Home मुंबई ‘नाणार’ प्रकल्प कोकणातच…!

‘नाणार’ प्रकल्प कोकणातच…!

338
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून लोकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र,अजून महाविकास आघाडी सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.दरम्यान,भाजपचे नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी हा प्रकल्प कोकणातच राहणार असल्याचा दावा केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देत नीलेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे की, ‘नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात जिथे आहे, तिथेच राहील हे १०० टक्के. खासदार विनायक राऊत यांना कोण विचारतं? मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाने प्रकल्पबाधितांच्या जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे. तसेच, जमीन खरेदी देखील केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार. पडद्याआड सगळे ठरले आहे,’.

दरम्यान,नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आह. मुख्यमंत्री या समितीला वेळ देतात का,’ याविषयी सध्या चर्चा सुरू असतांनाच नीलेश राणे यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here