मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : १२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पाठिंबा दिला आहे. मी शेतकऱ्यानं सोबत आहे आणि आपण सगळ्यांनी शेतकर्यां सोबत उभे राहिला पाहिजे अशी विनंती त्यांनी देशवासीयांना केली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचायला हवा. मी भारत बंदला पाठिंबा देतोय. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिमागे ठामपणे उभं राहायला हवं.” अशा आशयाचं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचं ठरलं लक्ष आहे.