Marathwada Sathi

मुस्लिम औरंगजेब नाव ठेवत नाही मग “औरंगाबाद ” नाव कशाला ?

औरंगाबाद : गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना ‘संभाजीनगर’ नावासाठी आग्रही आहे. मुस्लिम लोक सुद्धा आपल्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मग शहराचे नाव औरंगाबाद कशाला हवे ,असा सवाल शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.औरंगाबाद शहरातील कलाकट्टा या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आ.अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

सध्या औरंगाबादचे “संभाजीनगर” नामांतरावरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात मुख्यमंत्र्याच्या ट्विटरवर संभाजीनगर उल्लेख केल्याने अजूनच राजकीय वाद विवाद सुरु झाले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी जरी स्पष्टीकरण दिले असले तरी आमदार दानवेंच्या या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता असू शकते.

Exit mobile version