मुंबई । भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. पण, त्यांनी ती नाकारली. खडसे यांनी तेव्हाच प्रदेशाध्यक्षपद घेतले असते तर कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते. त्यांच्याजागी देवेंद्र फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि पुढे ते मुख्यमंत्री झाले, असा दावा खा. रावसाहेब दानवे यांनी केला.
खा. दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा खडसेंना प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विचारण्यात आले होते. त्यांना मंत्रिपदात अधिक रस होता, त्यामुळे त्यांनी ते पद नाकारले. खडसे आमचे नेते होते. त्यांनी पक्ष सोडल्याचे दु:ख आहेच, खडसे हा विषय आता भाजपसाठी संपलेला आहे. त्यांच्या पक्षांतराचा फारसा परिणाम होणार नाही. खडसे यांच्यासोबत एकही आमदार किंवा पदाधिकारी जाणार नाही.
दानवे म्हणाले, मी स्वत: खडसेंच्या घरी, फार्महाउस व सरकारी बंगल्यावरही गेलो होतो. आमची राजकारणावर चर्चा झाली. मतभेदांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता. २०१९ भाजपने राष्ट्रवादीचे केलेले नुकसान भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे खडसेंना प्रवेश दिला असावा. राष्ट्रवादीने खडसेंचा वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी करू नये,’ अशी अपेक्षाही खा. दानवे यांनी व्यक्त केली.
Home महाराष्ट्र खडसेंनी ‘ती’ ऑफर नाकारली अन् त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले; खा. रावसाहेब दानवे यांचा...