Home अर्थकारण शेतकरी आंदोलनामुळे ३५०० कोटींचे नुकसान ?

शेतकरी आंदोलनामुळे ३५०० कोटींचे नुकसान ?

822
0

नवी दिल्ली : गेल्या ४५ दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे तर मोदी सरकारकडून कृषी कायदे मागे घेण्यास उदासीनता दिसून येत आहे. याच दरम्यान दिल्लीच्या सीमेवर आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

ऋषभ शर्मा या व्यक्तीने शेतकऱ्यांना सीमेवरून हटवण्यात यावं यासाठीची एक याचिका केली आहे.आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवल्यामुळे दररोज जवळपास ३५०० कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे , असं या याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
सोबतच रस्ता जाम करून आंदोलन करन हे शाहीनबाग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेल्या दिशा-निर्देशाविरोधात असल्याचेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांकडून मोबाईल टॉवरचं नुकसान करण्यात आले . हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन आहे, असंही याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. . या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here