मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं. समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे.
त्यामुळे नवीन वर्षच्या स्वागतासाठी घरीच थांबे लागणार आहे.