Marathwada Sathi

स्वतः चे आमदार पद आधी टिकवा…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार जास्त टिकणार नाही असा आरोप भाजप ने सुरु ठेवला आहे .राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. निलेश राणे यांनी पवारांना ८० तासांच्या सरकारची आठवण करुन देत आहे . विधानसभा निवडणूकांनंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन आहे . अजित पवारांचं बंड आणि पहाटेचा शपथविधी याची फारकाळ चर्चादेखील रंगली होती.

अजितदादांनी साथ सोडल्यानं हे सरकार ८० तासांत फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सत्तानाट्याला आता एक वर्ष उलटून गेल्यानंतरही भाजप या घटनेवरुन महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. निलेश राणे यांनीही त्या घटनेचं उदाहरण देत एक ट्विट केलं आहे. अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपामध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत,’

Exit mobile version