Home क्रीडा जय शहांची घोषणा;टीम इंडियाला बोनस जाहीर…!

जय शहांची घोषणा;टीम इंडियाला बोनस जाहीर…!

685
0

मराठवाडा साथी न्यूज

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे.त्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियावर बक्षिसांचा पाऊस पडला आहे.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला तब्बल ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

विजयानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.“भारतीय क्रिकेटसाठी हे खास क्षण आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताना उत्कृष्ट कामगिरी केली” असे ट्विट जय शाह यांनी केले आहे.

दरम्यान,बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी आपल्या भावना व्यक्त करीत ट्विट केले आहे की,“लक्षणीय विजय.ऑस्ट्रेलियाला जाऊन अशा पद्धतीने कसोटी मालिका जिंकणे, हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात ठेवले जाईल. बीसीसीआय पाच कोटी रुपयांचा बोनस संघाला जाहीर करत आहे. या विजयाचे मूल्य आकड्यांच्या पलिकडचं आहे. दौऱ्यावरील संघाच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here